रंगभूमीवर पुन्हा ‘सखाराम बाइंडर’ — सयाजी शिंदे साकारणार सखाराम

विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाइंडर’ हे मराठी नाट्यसाहित्यातील एक अभिजात कलाकृती आहे. १९७२ साली प्रथम सादर झालेल्या या वास्तववादी नाटकाने आजही तींची तीव्रता आणि प्रभाव टिकवून ठेवला आहे. त्यामुळे अनेक रंगकर्मींना आणि संथांना या नाटकाला परत रंगभूमीवर आणण्याची सतत इच्छा राहिली आहे. वेगवेगळ्या भाषांत व विविध संस्थांमार्फत झालेल्या प्रयोगांमुळे ‘सखाराम बाइंडर’ ने वेळोवेळी प्रेक्षकांची मने झपाटलेली आहेत — आणि आता हा वादळी काळ पुन्हा एकदा रंगमंचावर परत येत आहे.

स्त्री-पुरूष नातेसंबंधांचे करकरीत वास्तव मांडणारे हे नाटक समाजाला ठसका देणारे आहे. या नव्या प्रस्तावनेत खास म्हणजे या नाटकातील सखारामची भूमिका सुप्रसिद्ध आणि बहुमुखी नट सयाजी शिंदे साकारत आहेत. सुमुख चित्र आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् यांच्या सहकार्याने ही निर्मिती सादर केली जात आहे आणि ही या निर्मितीसंस्थेची तिसरी नाट्यप्रस्तुती आहे.

या नाटकाबद्दल सयाजी शिंदे म्हणतात, “हे नाटक माझ्यासाठी एक वेगळा आणि जबरदस्त अनुभव आहे. रसिकांना पुन्हा या कलाकृतीचा प्रत्यय देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आजची पिढी थेट हे नाटक पाहिली नसल्याने, या संचाद्वारे ते तेंडुलकरांची ताकद आणि त्यांचे विचार समजून घेऊ शकतील.”

दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांचे मत असे आहे: “एका महत्त्वाच्या कलाकृतीला पुन्हा रसिकांसमोर आणणे ही आमची जबाबदारी आहे. तेंडुलकरांच्या लेखनाचा सन्मान राखत, त्यांच्या म्हणण्याच्या जवळ पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल. दिग्दर्शकीय शैली लोकाभिमुख ठेवून, सर्व शक्य बाजूंचा विचार करून हा नवा संच सादर केला जात आहे.”

सयाजी शिंदे यांच्यासोबत नाटकात नेहा जोशी, चरण जाधव, अनुष्का बोऱ्हाडे आणि अभिजीत झुंजारराव हे कलाकार आहेत. 

‘सखाराम बाइंडर’ चे हे नवे सादरीकरण लवकरच रंगमंचावर प्रेक्षकांना भुरळ घालणार आहे.

Spread the love

Related posts

Natya Parishad Puraskar : अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर; नीना कुलकर्णी आणि सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव

‘अरे हाय काय अन् नाय काय’… माधव परत येतोय’गेला माधव कुणीकडे’ नाटकाचा १५ जूनला शुभारंभ

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More